| पाताळगंगा | वार्ताहर |
रणरणत्या उन्हात वणवा पेटविण्याच्या मानवी वृत्ती मध्ये वाढ झाली असून डोंगराच्या समवेत रस्त्यालगत वणवा पेटविल्याने रस्त्यावर आपघाताला निमंत्रण मिळत आहे. दर वर्षी पावसाळा संपताच माळरानावर मोठ्या प्रमाणात गवत निर्माण होत असते. हेच गवत गुरांचे अन्न निर्माण होत असल्यामूळे गुरांच्या चा-यांचा प्रश्न मार्गी लागत आहे. मात्र माळरानावर वनवे लागत असल्यामुळे चार्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असताना, या गवतावर कोणी अज्ञात व्यक्ती पेटून दिले जाते. आणि त्याचे वणव्यात रूपांतर होते.
या वणव्यामुळे पक्ष्यांचे घरटे, गुरांचा चारा, औषधी वनस्पती, प्राणी तसेच आता जंगलातील तयार झालेला रानमेवा जळून खाक होत असल्याचे दुर्देवी चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. परंतू रणरणत्या उन्हामध्ये हा वणवा लागल्याने येथील परीसर असह्य होवून जात आहे. वणवा लावण्याच्या प्रवृत्तीला बंधने घालणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वणव्यामुळे आदिवासी यांच्या रोजगारला खिल बसत आहे. जंगलात अनेक प्रकारचा रानमेवा तयार झाल्यामुळे यांच्या वरती अदिवासीच्या कुटुंबांचा उदार निर्वाह होत असतो. मात्र विचित्र संकल्पने मुळे हा वणवा लावला जात आहे. वणवा लावून काय मिळते कुणास ठाउक? मात्र पर्यावरणाचा समतोल ठासळत चालाला आहे.