। सिद्धी भगत । अलिबाग ।
संघर्षमय आयुष्य त्यातही जगण्यासाठीचा संघर्ष याचा समतोल साधणं ज्याला जमलं त्यानं आयुष्याचं सोनं केलं. अडचणी, खाचखळगे, अवघड वाटा या प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. पण, न हरता, न खचता त्यावर हसतमुखाने मात करणं महत्वाचं असतं. आयुष्यात जशी एकामागोमाग एक वादळं यावीत आणि होत्याचं नव्हतं करून जावीत अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानादेखील खमकेपणाने एकटीनं उभं राहून आयुष्याला सडेतोड उत्तर दिलं ते म्हणजे अलिबाग एसटी आगारातील वाहक अर्चना अबू यांनी.
प्रवाशांचा सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात धावणारी लाल परी हीच माझा आधार बनली आहे. एसटी सारखे माझे जीवनही अडखळत सुरू असले तरीही जीवनाचे इप्सीत साधण्यात मी यशस्वी झाले आहे. आपण नीट राहावे व समोरच्याला नीट वागवावे अशा विचारांची नवदुर्गा म्हणजेच अलिबाग एसटी आगार कंडक्टर (वाहक) अर्चना शशांक अबु होय. आयुष्याचा चाकाला लालपरीने मोठी साथ दिल्याचा दावा अबु यांनी केला
असे जगावे दुनियेमध्ये, अव्हानाचे लावुन अत्तर!
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर!!
करंदीकरांच्या या ओळी एखाद्याच्या आयुष्यात खर्या ठराव्यात अगदी त्या प्रमाणेच अर्चना स्वतःहाच्या आयुष्यात खमकेपणाने उभ्या राहील्या. अचानक वादळ यावं आणि सगळं संपून जावं असा प्रसंग अर्चना यांच्या अयुष्यात घडला. आयुष्याचा आधार असलेल्या पतिच्या निधनानंतर दोन मुलांचा सांभाळ कसा करावा असा प्रश्न अर्चाना यांना सतवत असताना 2005 साली एस्टी कंडक्टरची भरती निघाली व अर्चना यांना पुढेजाण्याचा मार्ग मिळाला.
अर्चनाच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरूवात 2 हजार 800 रूपयांनी झाली. सुरुवातीनला अनेक समस्यांना सामोरे जावून अर्चना यांनी आपल्या मुलांचा संभाळ करुन त्यांच्या आयुष्याला कलाठनी दिली. पण म्हणतात ना जे विधीलीखीत आहे ते मोडता येत नाही आणि जे विधात्याने लिहीलय ते टाळता येत नाही. पोटच्या पोरीच आयुष्य संपताना त्या आईच काळीज तिळ तिळ तुटलं. अर्चना यांच्या अयुष्यातील हा दुसरा प्रसंग ज्यामुळे त्या पुर्णपणे तुटून गेल्या. नियती आयुष्याशी खेळून गेली आणि पुढयात प्रश्नांच मालिका उभी राहीली.
पण हारून जमणार नव्हतं कारण डोळ्यासमोर उरलेल आयुष्य आणी पदरात असलेल्या आपल्या मुलाच भविष्य अर्चना यांना दिसत होत. कोरोना काळात सर्वच ठप्प झाल. पुन्हा आपला उर्दनिर्वाह कसा करावा व या समस्येला तोंड कस द्याव अस असतानाही अर्चना ह्या कोलमडल्या नाही. काटयांमधुन वाट काढत व आलेल्या समस्याच्या खंबीरपणे सामना करात अर्चना नव्याने आयुष्याला कलाठनी देण्याचा प्रयत्न करत आहेत.
- आयुष्यातील आव्हानांना न घाबरता व बिकट परिस्थितीचा खंबीरपणे सामना करत मी आजवर इथपर्यंहत पेाहोचले आहे. आयुष्यत अनेक गोष्टी मी गमावल्या परंतु उरलेल्या आयुष्यासाठी आणी माझ्या मुलासठी माला जगायच आहे. महीलांनो घाबरू नका पुढे जा व स्वताच्या बळावर आयुष्य घडवा.