भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी सूरत जिल्ह्यात दाखल झाली होती. मंगरूळ तालुक्यातील ढंखवावमध्ये यात्रेचं स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी हजारो समर्थक तिथे दाखलं झाले होते. राहुल गांधी हे (दि.12) मार्च ते (दि.17) मार्चदरम्यान महाराष्ट्रात असणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी हे धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर आणि जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहेत. नंदुरबारमधील आदिवासी न्याय संमेलनात सहभाग घेणार आहेत.

Exit mobile version