राज्याच्या हितासाठी एकत्र येऊ

अजित पवार यांचे सुतोवाच
मुंबई | प्रतिनिधी |
राज्याच्या हितासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्र यावं लागेल असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्याचं विधान केलं आहे. यावरुन बोलताना पवार म्हणाले की, शिवसेनेने नाना पटोले यांना टोला लगावताना विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला शरद पवार यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांना एकत्र काम करावं लागेल असं म्हटलं होतं. यामुळे पुढील निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती होणार का अशी चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे.

Exit mobile version