अखिलेश यादव यांची मोदी सरकावर टीका

आधी फेकू, आता बेचू या नव्या विशेषणाचा वापर
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सार्वजनिक क्षेत्रातील चाललेल्या घडामोडींना आधार करून, मोदी सरकारवर टीका केली आहे. याप्रसंगी, मोदी सरकार म्हणजे आधी फेकू, आता बेचू अशा नव्या विशेषणाचा वापर अखिलेश यांनी केला आहे.
युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमध्ये भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांचे पूर्वीचे फेकू हे विशेषण विस्मरणात जात असतानाच आता बेचू हे नवे विशेषण अखिलेश यांनी वापरले आहे. एअर इंडियाची सरकारने केलेली विक्री तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या अनेक प्रभागांमधल्या निर्गुंतवणुकीच्या चर्चा सध्या जोर धरत आहे. तसेच देशातील विविध तेल कंपन्यांनी इंधनाच्या विक्रीतून तब्बल 600 टक्के नफा कमावल्याचा दावाही अखिलेश यांनी केला आणि त्याचा हिशोब भाजपकडे मागितला आहे.अखिलेश यादव यांनी सरकारवर गरिबांचे खिसे कापून श्रीमंतांच्या तिजोर्‍या भरल्याचा आरोप केला आहे.
आगामी निवडणुकांनंतर समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात सरकार स्थापन केले की, ते विद्यमान सरकारचे सर्व अतिरेक बंद करेल आणि समाजातील सर्व घटकांची समान काळजी घेईल, असे यादव यांनी ठामपणे सांगितले. शेतकर्‍यांवर तीन काळे शेती कायदे लादले गेले आहेत आणि ते त्याचा विरोध करत आहेत पण भाजप सरकार ते ऐकत नाही, अखिलेश यादव म्हणाले.
आझमगडच्या लोकांना माहित आहे की विकासाची कामे कोणी केली आहेत, श्री यादव यांनी विकासावरील एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले आणि गोरखपूरचे लोक भाजपचा अहंकार खाली आणतील असे ठामपणे सांगितले.
लखीमपूर खेरी हिंसाचाराचा संदर्भ देत यादव म्हणाले, भाजप सरकारने राज्यातील शेतकर्‍यांचा अपमान केला आहे आणि त्यांना वाहनाच्या टायरखाली चिरडले आहे. ही लोकशाही आणि संविधान वाचवण्याची निवडणूक आहे, असे सांगून त्यांनी समाजवादी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधत यादव म्हणाले, मुख्यमंत्री बाबा युवकांना लॅपटॉप देत नाहीत कारण त्यांना ते कसे चालवायचे हे माहित नाही.

Exit mobile version