| मुंबई | प्रतिनिधी |
मालेगाव येथे 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज, गुरूवारी विशेष एनआयए न्यायालयाने जाहीर केला. यात या खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
मालेगावातील मुस्लीमबहूल भागात एका धार्मिक स्थळाबाहेर 29 सप्टेंबर 2008 रोजी एका दुचाकीमध्ये झालेल्या स्फोटात 6 जणांचा मृत्यू तर 101 जण जखमी झाले होते. या प्रकरणाची चौकशी सुरुवातीला एटीएस कडून आणि नंतर एनआयए कडून करण्यात आली. या प्रकरणानंतर पहिल्यांदाच ‘हिंदू दहशतवाद’ पसरवण्याचा आरोप करण्यात आला होता.
आरोपींची नावे
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित
मेजर रमेश उपाध्याय
अजॉय रहीरकर
सुधाकर द्विवेदी
सुधाकर चतुर्वेदी
समीर कुलकर्णी.
सरकारी पक्षाचा दावा
एनआयएच्या वतीने विशेष सरकारी वकील अविनाश रसाळ यांनी बाजू मांडली. त्यांनी आरोपींविरोधात कॉल डेटा रेकॉर्ड, इंटरसेप्ट केलेले फोन कॉल्स आणि आरोपींकडून जप्त केलेल्या साहित्याच्या आधारे भक्कम पुरावे सादर केले. सरकारी पक्षाचा मुख्य युक्तिवाद असा होता की, देवळाली येथील सुधाकर चतुर्वेदीच्या घरात आरडीएक्स (RDX) सापडले होते आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली तिथेच बॉम्ब तयार करण्यात आला होता. बचाव पक्षाचा प्रतिवादबचाव पक्षाने सरकारी पक्षाचे सर्व आरोप फेटाळून लावले.
29 सप्टेंबर 2008 रोजी भिक्कू चौकाजवळील मोटरसायकलला बसलेला बॉम्ब फुटला, ज्यानिमित्त सहा लोक ठार झाले आणि 100 हून अधिक जखमी झाले. महाराष्ट्र एटीएसने सुरुवातीचा तपास करत साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर (भाजपच्या माजी खासदार) आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना संशयित म्हणून अटक केली. 2011 मध्ये एनआयएने प्रकरण हस्तगत करून तपास पुन्हा सुरु केला. 2016 मध्ये एटीएसच्या काही आरोपांना नाकारून काही आरोपींपासून सुटका केली. मात्र, यूएपीए आणि आयपीसी अंतर्गत गंभीर आरोप कायम ठेवले.1 लाखांहून अधिक पानांचे पुरावे, 300 साक्षीदारांची साक्ष या सर्वांचा आढावा घेऊन निकाल राखून ठेवला होता. कोर्टाने सातही आरोपींना निकालावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले.







