28 नोव्हेंबर, चलो आझाद मैदान…

संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आवाहन
मुंबई | प्रतिनिधी |
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या शेतकरी,कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सर्व डावे-पुरोगामी पक्ष-संघटनांच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानावर 28 नोव्हेंबरला संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.या महापंचायतीच्या निमित्ताने उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे आंदोलनात शहीद झालेल्या शेतकर्‍यांना अभिवादन करण्यासाठी या शहिदांचे अस्थिकलश संपूर्ण राज्यभर मानवंदना देणेकरिता फिरवण्यात येणार आहे.
हे सर्व अस्थिकलश शनिवारी 27 नोव्हेंबर 2021 रोजी, छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा (शिवाजी पार्क, दादर),मुंबई याठिकाणी दुपारी 12 वाजता एकत्रित आणले जाणार आहेत. छत्रपतींच्या पुतळयासमोर या अस्थिकलशांना मानवंदना दिलेनंतर हे अस्थिकलश घेवून वाहनजत्था अनुक्रमे चैत्यभूमी (दादर), हुतात्मा बाबू गेनूंचा पुतळा (परळ), आणि सायं.4 वाजता मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचे पुतळयांसमोर मानवंदना दिल्यानंतर अस्थिकलशांना मानवंदना देणेचा कार्यक्रम त्यादिवसापुरता पार पडेल.

शहीद कलश शेकाप कार्यालयात
शहीद शेतकर्‍यांचे अस्थिकलश शनिवारी रात्री भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या, बेलार्ड इस्टेट, फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात ठेवले जातील व तेथून सकाळी 11 वाजता आझाद मैदान, मुंबई येथील ङ्गङ्घसंयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीच्या सभा मंडपात आणले जाणार आहेत.

या संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतीसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’चे राकेश टिकैत, डॉ.दर्शन पाल, युध्दवीर सिंह, हनान मोल्ला, अतुलकुमार अंजान, राजाराम सिंह, आदि राष्ट्रीय किसान नेते उपस्थित राहणार आहेत.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील उद्दाम भाजप सरकारला अखेर आपला पराभव मान्य करीत तिन्ही शेतकरीविरोधी, जनविरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिणे कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करणे भाग पडले. या कायद्यांविरुद्ध गेले वर्षभर प्रचंड दडपशाहीचा सामना करीत, प्रचंड त्याग करीत देशभरातील जे शेतकरी, शेतमजूर आणि कामगार जिद्दीने लढले, त्या सवार्ंचे भारतीय शेतकरी कामगार पक्ष मन:पूर्वक अभिनंदन करीत असल्याचे शेकाप मध्यवर्ती कार्यालयीन चिटणीस अ‍ॅड.राजू कोरडे यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिलेले आहे.
शेतकर्‍यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट किमान आधारभावाची हमी देणारा केंद्रीय कायदा करा ही कळीची मागणी सरकारने अद्याप मान्य केलेली नाही. ती मान्य न केल्यामुळे .षी अरिष्ट अधिक गडद झाले आणि गेल्या 25 वषार्ंत 4 लाखांहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. या 4 लाख शेतकरी आत्महत्यांपैकी जवळपास 1 लाख आत्महत्या या मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या गेल्या 7 वषार्ंच्या कार्यकाळातच झाल्या आहेत. गेले वर्षभर सुरू असलेल्या किसान संघर्षात सुमारे 700 शेतकर्‍यांचे बळी गेले आहेत, त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार थेट दोषी आहे. पंतप्रधान आणि भाजप सरकारने आपल्या असंवेदनशील आणि आडमुठ्या भूमिकेमुळे झालेल्या शेकडो शेतकर्‍यांच्या मृत्यूची जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी आणि त्यांच्या कुटुंबाना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय शेतकरी कामगार पक्षाने या निमित्ताने केलेली आहे.


नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा संयुक्त किसान चळवळीने केलेला हा दुसरा पराभव आहे. शेतकर्‍यांच्या संयुक्त आंदोलनामुळे त्यांना यापूर्वी भूसंपादन अध्यादेश रोखण्यास भाग पाडले गेले होते. पंतप्रधानांची घोषणा म्हणजे शेतीचे कॉर्पोरेटीकरण आणि नवउदार आर्थिक धोरणांचा आक्रमक पाठपुरावा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांविरुद्धचा मोठा विजय आहे. शेकापचे सरचिटणीस आम.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शेतकरी कामगार पक्ष या संयुक्त संघर्षातील सर्व हुतात्म्यांना अभिवादन करीत असून आपल्या सर्व मागण्या पूर्ण होईपयर्ंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करत आहे.
राजू कोरडे,शेकाप नेते

गाफील राहणार नाही
आपल्याला अजूनही गाफील राहून चालणार नाही आणि संसदेत कायदे प्रत्यक्षात रद्द होण्याची वाट पहावी लागेल. आपल्या घोषणेमुळे शेतकर्‍यांचा संघर्ष संपुष्टात येईल, असा पंतप्रधानांचा समज असेल तर तो साफ चूक आहे. रास्त आधारभावाचा कायदा मंजूर होईपयर्ंत, वीज दुरुस्ती विधेयक आणि कामगारविरोधी श्रम संहिता मागे घेईपयर्ंत हा संघर्ष सुरूच राहील. लखीमपूर खेरी आणि कर्नालच्या मारेकर्‍यांना कठोर सजा मिळेपयर्ंत हे आंदोलन सुरूच राहील. आजचा विजय येत्या काळातील अनेक संयुक्त संघषार्ंना चालना देईल आणि नवउदार आर्थिक धोरणांचा प्रतिकार करताना शेतकरीविरोधी, कामगारविरोधी भाजपला आम्ही अनेकदा पराभवाची चव चाखायला लावू, हे नक्की!असेही या पत्रकातून सुचित करण्यात आलेले आहे.

शनिवारी 27 नोव्हेंबर रोजीच्या शहीद किसान अस्थिकलश मानवंदना कार्यक्रम आणि रविवारी 28 नोव्हेंबर ङ्गङ्घसंयुक्त शेतकरी कामगार महापंचायत या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता, परंतु दि.28नोव्हेंबर रोजीच्या संयुक्त शेतकरी कामगार महापंचायतकरिता पक्षाचे कार्यकर्ते आणि सहानुभूतीदार जनता यांना शक्य तितक्या मोठ्या संख्येने मुंबईला घेऊन यावे, असे आवाहन कोरडे यांनी केलेेले आहे.

Exit mobile version