सहकारी संस्थांना लेखापरिक्षण पूर्ण करण्याचे आवाहन

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पशू, दुग्ध व मत्स्य सहकारी संस्थांचे लेखापरिक्षण 31 जुलै अखेर पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा विशेष लेखापरिक्षक सहकारी संस्था पदुम एस. व्ही. सासवडकर यांनी केले आहे.

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व पदुम संस्थांचे वैधानिक लेखापरिक्षण 31 जुलै अखेर पूर्ण करुन लेखापरिक्षण अहवाल संस्था व जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग 2, सहकारी संस्था या कार्यालयास तसेच संबंधित जिल्हयाचे सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाला सादर करण्यात यावेत, असे आवाहन रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयातील पशु, दुग्ध व मत्स्य संस्थांचे पदाधिकारी व व्यवस्थापक/सचिव यांना करण्यात येत आहे.

Exit mobile version