अश्विनने मोडला कुंबळेचा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक बळी

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

इंदोर येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 99 धावांनी पराभव केला. फलंदाजांनी आधी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चोपले त्यानंतर गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना रोखले. अश्विन आणि जाडेजा यांनी भेदक मारा केला. रविचंद्रन अश्विनने 7 षटकांत 41 धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. या सामन्यात त्याने नवी विक्रम केला केला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात सर्वाधिक बळी घेणारा भारताय गोलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता.

अश्विनने ऑस्ट्रेलियाविरोधात एकूण 144 गडी बाद केले आहेत. तर, कुंबळेने 142 गडी बाद केले आहेत. कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत कपिल देव यांचाही समावेश आहे. कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध 141 गडी बाद केले असून, कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध 135 बळी टिपले आहेत.

Exit mobile version