नदीच्या पात्राजवळ खड्डे खोदून साठवले जातेय पाणी
। पाताळगंगा । वार्ताहर ।
उन्हाळा सुरु झाला की पाणीटंचाईचे सावट निर्माण होत असते. यामुळे घोटभर पाणी मिळण्यासाठी जणू धडपड करावी लागत आहे. मात्र, पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळतच नाही.विहीर, तलाव, कूपनलिका यासारखे असलेल्या पाण्याच्या स्त्रोतांनी तळ गाठले असल्याने, नदीच्या पात्रात खड्डे करून त्यामधे पाणी जमा झाले की त्याचा वापर घरघुती वापरासाठी करण्यात येत असल्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
मे महिन्यामध्ये पाणीटंचाईचे सावट अधिक गडद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.पावसाळ्यात जलाचे असलेले स्त्रोत्र पूर्ण भरत असले, तरीसुद्धा मार्च, एप्रिल आणी मे महिन्यामध्ये पाण्याचे मृगजळ तयार होत आहे. मात्र, पिण्यासाठी पाणी तरी कोठून आणायचं? हा प्रश्न सध्या डोके वर काढत आहे. डोंगराळ आशा दुर्गम भागात राहणार्या आदिवासी बांधावांना पाण्यासाठी जणू कसरत करावी लागत आहे. यामुळे पावसाळ्यात वाहणारे डोंगराच्या कडे कपारीतून पाझरणारे पाणी आणि झरे याच अल्प पाण्यावर आपली तृष्णा शांत करावी लागत आहे.
गेल्या काही वर्षामध्ये तालुक्याच्या ठिकाणी पाणीटंचाईचे ग्रहण लागलेले सुटत नाही. यामुळे याचा सामना कसा करावा, हा प्रश्न सध्या डोके वर काढत आहे. शिवाय, या पाण्यासाठी रात्रही जागावी लागत आहे. मात्र, असे असले तरी याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. तालुक्यामध्ये हाताच्या बोटावर मोजेल एवढेच गावातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, बाकी ठिकाणी मात्र जणू वानवाच आहे.