| तळा | प्रतिनिधी |
परतीच्या पावसामुळे भातशेतीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघाडी दिली असल्याने तालुक्यातील बळीराजा भात कापणीच्या कामात व्यस्त झाला आहे. त्यामुळे बाजारपेठे परिसरात शुकशुकाट पसरला आहे.
यंदा परतीच्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी भात पिकाचे नुकसान झाले आहे. लहरी पावसाचा भरोसा नसल्यामुळे तळा तालुक्यात शेतकरी वर्गाची भात कापणीची लगबग सुरू झाली असून तालुक्यातील शेतकरी वर्ग भात कापणीच्या कामात मग्न झाला आहे. मात्र, वाढलेल्या मजुरीचा फटका बळीराजाला बसला आहे. वाढती महागाई, खते व बी बियाणांचे वाढलेले दर यामुळे सध्याच्या काळात शेती करणे परवडणारे नाही. मात्र, अशा परिस्थितीत देखील तालुक्यातील बहुतांश शेतकरी परवडत नसली तरी शेती करत आहेत.परतीच्या पावसामुळे भात शेतीचे होणारे नुकसान वाचवण्यासाठी दिवसा कडक उन्हातही भात कापणी केली जात आहे. त्यातच भात कापणीला मजुरांची देखील कमतरता जाणवत आहे. तरी देखील पावसामुळे भात भिजण्याची शक्यता असल्याने मिळतील ते मजुर घेऊन लवकरात लवकरात लवकर भात कापणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तालुक्यातील शेतकरी वर्ग भात कापणीच्या कामात गुंतला असल्याने बाजारपेठ परिसरात देखील शुकशुकाट पसरला आहे.
बळीराजा भात कापणीत व्यस्त

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606