बंगळुरूचा ‘विराट’ विजय

राजस्थानची सपशेल हाराकिरी

| मुंबई | प्रतिनिधी |

करो या मरो या लढतीत आरसीबीने राजस्थानचा 112 धावांनी पराभव केला. आरसीबीच्या भेदक गोलंदाजीपुढे राजस्थानच्या फलंदाजांनी हराकिरी केली. राजस्थानचा डाव अवघ्या 59 धावांत संपुष्टात आला. हेटमायरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाने झुंज दिली नाही. 172 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 10.3 षटकात 59 धावांत संपुष्टात आला. नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या गोलंदाजांना आरसीबीच्या फलंदाजांना सुरुवातीलाच बाद करण्यात अपयश आले. पहिल्या दोन मोठ्या भागिदारीच्या जोरावर आरसीबीने 171 पर्यंत मजल मारली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी संयमी फलंदाजी केली. पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली. मॅक्सवेल आणि फाफ यांनी दुसर्‍या विकेटसाठी 69 धावांची भागिदारी केली. राजस्थानच्या गोलंदाजांना सुरुवातीला विकेट काढण्यात अपयश आले.

राजस्थानच्या गोलंदाजांनी सरुवातीला विकेट घेतल्या नाहीत. मधल्या काही षटकात झटपट विकेट घेत राजस्थानने कमबॅक केले. पण अखेरच्या षटकात आरसीबीच्या फलंदाजांनी धावा चोपल्या. 18 व्या षटकात मॅक्सवेल बाद झाला तेव्हा आरसीबीची धावसंख्या 137 इतकी होती. त्यानंतर अखेरच्या 15 चेंडूत आरसीबीने 34 धावा काढल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना डेथ ओव्हरमध्ये धावा रोखता आल्या नाहीत. त्यामुळे आरसीबीने 171 धावांपर्यंत मजल मारली.
172 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. फॉर्मात असलेला यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांना खातेही उघडता आले नाही. इथकेच काय कर संजू सॅमसनही चार धावा काढून बाद झाला. पहिल्या पाच षटकात राजस्थानचा अर्धा संघ तंबूत परतला. झटपट विकेट जात असताना राजस्थानचा एकाही फलादांजाने संयमी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला नाही. पावरप्लेमध्ये राजस्थानची अवस्था पाच बाद 28 धावा इथकीच होती. संजू सॅमसन आणि जो रुट या अनुभवी फलंदाजांनी राजस्थानचा डाव सावरण्याची गरज होती. पण त्यांनी विकेट फेकली.

Exit mobile version