भांडण सोडवायला गेल्याच्या रागातून एकाला मारहाण

रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
| रेवदंडा | प्रतिनिधी | रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 12 ऑगस्ट रोजी सांयकाळी 6:00 वाजण्या च्या सुमारास मौजे साळाव संजयनगर येथे भांडणे चालू होती. म्हणून भांडणे सोडविण्याकरीता फिर्यादी रा.साळाव संजयनगर गेले. या गोष्टीचा मनात राग धरून दोघांजनांनी शिवीगाळ केली. यातील एकाने लाथेने मारून व दुसऱ्याने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यात झोड मारून दुखापत केली. याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक फौजदार श्री.महाले करीत आहेत.

Exit mobile version