पोषक वातावरण असल्याने स्वबळावर लढणार

विनायक देशमुख यांचे प्रतिपादन
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यात 21 डिसेंबरला होत असलेल्या चारही नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आहे. चारही नगर पंचायतीच्या सर्व 17 जागांवर काँग्रेस आपला उमेदवार देणार आहे, असे सांगतानाच निवडणुकीसाठी जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा प्रभारी विनायक देशमुख यांनी केले आहे.
जैतापकर कॉलनी येथील जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, विकास सावंत, विलास गावडे, साक्षी वंजारी, महेंद्र सांगेलकर, चंद्रशेखर जोशी, अरविंद मोंडकर, इरशाद शेख, विजय प्रभू, दादा परब, समिर वंजारी, विधाता सावंत, आदी मान्यवर, पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी देशमुख म्हणाले की, सहकार क्षेत्रातील निवडणूकीत कोणती भूमिका घ्यायची याबाबत विचार सुरु आहे. जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा नंबर वन बनेल, असा विश्‍वास आहे. काँग्रेसचे चिन्ह घराघरात जाण्यासाठी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला सुगीचे दिवस आणून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासक भाष्य देशमुख यांनी केले आहे.

Exit mobile version