। कोलाड । वार्ताहर ।
हे नारायणा माझ्या मनामध्ये कधीही वाईट दुर्बुद्धी येऊ देऊ नकोस. आता माझ्या चित्तालाच असे कर कि माझे चित्त तुझे चरण घट्ट धरून राहील. माझ्या मनामध्ये तूझ्या विषयी जो भक्तीभाव उत्पन्न झाला आहे तो सिद्धीस म्हणजे फळप्राप्ती होई पर्यत जावो. या लाभापेक्षा इतर कोणताही लाभ उरला नाही, असे मत रायगड भुषण मारुती कोल्हाटकर यांनी आंबेवाडी येथील आयोजित किर्तन सेवेत अभंगाच्या आधारे स्पष्ट केले.
यावेळी ह.भ.प. नंदू तेलंगे, दत्ताराम कोल्हाटकर, नारायण दहिंबेकर, रवि मरवडे, गणेश दिघे, किरण ठाकूर, रुपेश शेळके, गणेश नलावडे, अक्षय ओव्हाळ, चंद्रकांत बाईत यांच्यासह भाविक, समस्त ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ उपस्थित होते.