| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील वरसगाव नाका येथील भारती कांतीभाई गांधी यांचे शनिवार, दि.27 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 80 वर्षांच्या होत्या. भारती गांधी यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, व्यापारी, स्थानिक नागरिक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांचे पती, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार, दि.5 सप्टेंबर तर उत्तरकार्य विधी गुरुवार, दि. 8 सप्टेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी होणार आहेत.