। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत मधील दोन ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याची माहिती आ. महेंद्र थोरवे फाऊंडेशनला मिळाली होती. त्यानुसार फाउंडेशनच्या माध्यमातून रामचंद्र बदे यांच्या प्रयत्नाने भगूची वाडी आणि नवीन देवपाडा अशा दोन ठिकाणी बोअरवेल खोदण्यात आल्या.
तालुक्यातील कळंब ग्रामपंचायतीमध्ये नळपाणी योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे कळंब ग्रामपंचायतीमधील काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. येथील पाणीटंचाई वाढली असता ग्रामस्थांच्या मागणीनंतर आ. महेंद्र थोरवे फाउंडेशन कडून तात्काळ बोअरवेल खोदणारी मशीन पाठवून देण्यात आली. त्यानंतर भागूची वाडी आणि नवीन देवपाडा या दोन्ही ठिकाणी बोअरवेल खोदून देण्याचे काम पुर्ण करण्यात आले.