सुक्या गवताला आगी लावण्याचे प्रकार

| रसायनी | वार्ताहर |

ग्रामीण भागात क्रिकेटचा हंगाम सुरू झाला आणि गवताला आग लागण्यास सुरूवात झाली. त्यामुळे अनेक जीव आगीत होरपळून मृत्यू झाल्याचे दिसत आहे.

पाऊस थांबला असून जमीन पुर्णपणे सुकली आहे, याचाच फायदा घेत आगी लावण्यात येत आहे. यामुळे निसर्गाची हानी होतच आहे, पण जनावरे, गायी, बैल, म्हशी यांच्या सुक्या चार्‍याची राखरांगोळी होत आहे. बिळात वास्तव्य करणारे भूचर प्राणी, पक्षी यांची हत्त्या केली जाते. शेतकरी, निसर्ग प्रेमी, पर्यावरप्रेमींनी लावलेल्या झाडांची राख होत आहे. ही आग भुई ससा पकडणे, अन्य प्राण्यांची शिकार करणे, भरावसाठी माती चोरून नेणे, क्रिकेट प्रेमी खेळाचे मैदान तयार करण्यासाठी करतात. तर गावाचं शहरी करण होत असताना आजूबाजूचे बांधकाम व्यावसायिक जागा उपलब्ध व्हावी म्हणून असे प्रकार करत असावेत अशी चर्चा सुरू आहे. याला वेळीच आला न घातल्यास निसर्गाची हानी होईलच, पण जीव जीवांची हत्या होण्याचे प्रमाण वाढत जाईल.

Exit mobile version