। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील तहसील कार्यालय असलेल्या टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या टेकडीवर दररोज असंख्य नागरिक चालण्यासाठी जात असतात. त्यांच्या सहभागाने दरवर्षी टेकडीवर वृक्षारोपण झाले. तर ज्येष्ठ नागरिक आणि महिला तसेच लहान मुलांचे देखील सहभाग या वृक्षारोपणात केला आहे.
कर्जत येथील मध्यवर्ती ठिकाणच्या शासकीय कार्यालये असलेल्या टेकडीवर पायर्यांच्या मार्गावर सभोवतालच्या मोकळ्या जागेवर दिलीप कदम, रामकुमार गुप्ता आदींच्या पुढाकाराने निसर्ग मित्रांच्या सहकार्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लहान मुलांबरोबरच, महिला वर्ग तसेच वयाची 75 वर्षे पूर्ण केलेले अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. तहसील टेकडीच्या पायी मार्गावर दगडी पायर्यांचे बाजूला बेल, कदंब, वड, पिंपळ, कडूनिंब, बदाम, जांभुळ, चिंच, उंबर आदीची लागवड करण्यात आली. दरवर्षी मोजकीच झाडे लावून त्याचे संवर्धन केल्यानेच एकेकाळी ओसाड झालेली ही टेकडी आता हिरवाईने बहरली आहे. या वृक्षारोपणासाठी नारायण जुन्नरकर यांनी वृक्ष लागवडीकरीता रोपे तसेच संदीप भालेराव, राजेश घेवारे यांनी सहकार्य केले.
या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात दिलीप कदम, सायली कदम, सोनिया गरवारे, जयंत पाटकर, श्रीकांत ओक, आशिष कोल्हे, महेंद्र चंदन, राजू पोतदार, रामकुमार गुप्ता, नरेश बैलमारे, दीपक भालेराव, मुकुंद भागवत, शिवा राजपूत, सुरेश पाटील, किशोर जैन, मनिषा हुलावले, रामकिशोर गुप्ता, मनिष परमार, राजू ओसवाल, कुमार ओसवाल, श्रीकांत मनोरे, आशुतोष कुळकर्णी, मनोहर पाटील, मुरलीधर पाठक, रणजीत जैन, अरविंद जोशी, विलास नलावडे, कमलेश जैन, अनिल साळंके आदी उपस्थित होते.