रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त

। पनवेल । वार्ताहर ।

पनवेल तालुक्यातील वावंजे गावात येणार्‍या रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याचा त्रास येणा-जाणार्‍या प्रवासी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना होत आहे.

वावंजे गावात जाण्या-येण्यासाठी दोन रस्ते पर्यायी आहेत. पावसाळा सुरू होऊन जवळपास तीन महिने होत आले आहेत. मात्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात येत नाही. त्यामुळे खड्ड्यातूनच नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. पाले खुर्द ते वावंजे रस्ता आणि देवीचा पाडा ते वावंजे रस्ता हा पूर्ण खड्ड्यात गेला आहे. पनवेलच्या स्थानिक आमदारांनी याकडे लक्ष न दिल्याने ग्रामस्थ नाराज आहेत.

Exit mobile version