। पनवेल । वार्ताहर ।
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवण्यात येणार्या सेवा समर्पण अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे आ.रमेश पाटील व भाजपा मच्छीमार सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅड.चेतन पाटील यांच्या वतीने कोपरखैरणे रेल्वे स्थानकाजवळील परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या सेवा समर्पण अभियानांतर्गत नवी मुंबईतील बोनकोडे येथील जनविकास मर्मियर बाल आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व फळे वाटप करण्यात आली.
यावेळी देशातील सर्व नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियान संपूर्ण देशामध्ये राबविणे सुरू केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ, सुंदर व पर्यावरणयुक्त देशाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर हे अभियान राबविण्यास सुरूवात झाली आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी आपला हातभारही लागणे आवश्यक असल्याने हे सेवा समर्पण अभियान त्यातलेच एक पाऊल असल्याचे आ.रमेश पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी राज जयस्वाल, मयूर धुमाळ, सुनील किंद्रे, दिलीप व्यवहारे, विजया जाधव, दीपक चौधरी, प्रभाकर गायकवाड, यश कौर आदी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.