| पाली | वार्ताहर |
गड किल्ल्यांचे जतन व्हावे, गड परिसरातील वनसंपदा कायम राहावी, पर्यावरण संवर्धन व्हावे या दृष्टीने सुधागड तालुका रहिवाशी सेवा संघ मुंबईच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून नुकतीच किल्ले सुधागडावर स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी किल्ले सुधागडावरील भोराई माता मंदिर, पंतसचिव वाडा, महादेव मंदिर, महादरवाजा या प्रमुख ठिकाणचा परिसर स्वच्छ करून तेथील प्लास्टिक कचरा गडाखाली आणून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या मोहिमेत श्री भोराई देवस्थानचे अध्यक्ष सुरेश खैरे, बळीराम निंबाळकर, धनंजय साजेकर यांनी अनमोल सहकार्य केले. संस्थेचे युवा तसेच जेष्ठ कार्यकर्ते व गडप्रेमींनी या मोहिमेत सहभाग घेऊन हि स्वच्छता मोहीम यशस्वी केल्याबद्दल बद्दल संस्थेचे अध्यक्ष दत्ताराम पोंगडे व विश्वास चांदे यांनी आभार व्यक्तकेले.