| न्युयॉर्क | वृत्तसंस्था |
ऑस्ट्रेलियाने टी-20 विश्वकरंडकातील साखळी फेरीच्या लढतीत घवघवीत यश संपादन केले. तीन विजयांसह त्यांनी ‘सुपर आठ’ फेरीतही प्रवेश केला आहे. मात्र, साखळी फेरीतील या कामगिरीचा ‘सुपर आठ’ फेरीत कोणताही फायदा होणार नाही. याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जॉश हॅझलवूड याने टी-20 विश्वकरंडकाच्या फॉरमॅटवर टीका केली आहे. जॉश हॅझलवूड म्हणाला, साखळी फेरीत सर्व सामन्यांत विजय मिळवून चांगला नेट रनरेट ठेवल्यानंतरही याचा फायदा ‘सुपर आठ’ फेरीत होणार नाही. अशा नियमांचा टी-20 विश्वकरंडक पहिल्यांदाच आयोजित केला जात आहे, याचे आश्चर्य वाटत आहे.