। कोलाड । वार्ताहर ।
उत्तर प्रदेश राज्यातील लखीमपूर खिरी येथील शेतकर्यांवर गाड्या घालून बळीराजाला चिरडणार्या केंद्र सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस व इतर घटक पक्षांतर्फे जाहीर निषेध केला.
शेतकर्यांच्या अंगावर गाड्या घालुन क्रूर कर्माच्या वाईट भावनेने केलेल्या हत्येच्या कटाचा आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करीत असुन यापुढे आम्ही बळीराजावर करण्यात येणार्या कोणत्याही अन्याय खपवून घेणार नाही. आम्ही नेहमीच शेतकर्यांचा पाठीशी उभे राहू असे मत पालकमंत्री आदितीताई तटकरे यांनी व्यक्त केले.
यावेळी रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या महिला अध्यक्ष प्रितम पाटील, रोहा पंचायत समिती सदस्य सिद्धी रजिवले, आंबेवाडी जि.प.गट अध्यक्ष सुप्रिया जाधव, आंबेवाडी जि.प.गट अध्यक्ष नरेंद्र जाधव, खांब पं. स. गण अध्यक्ष समीक्षा घावटे, खांब पं. स. गण अध्यक्ष मनोज शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.