आत्मविश्वास महत्त्वाचा

| गयाना | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यापूर्वी मस्तीच्या मूडमध्ये दिसला. भारताने सुपर-8 फेरीच्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी पराभूत केले होते. या उपांत्य सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत रोहितला प्रश्न विचारण्यात आला की, ऑस्ट्रेलियाच्या विजयातून सर्वात मोठी गोष्ट कोणती मिळाली. त्यावर उत्तर देताना रोहित आधी हसला आणि त्याने उत्तर दिले, हेच की आता ऑस्ट्रेलिया संघ या विश्वचषकाचा भाग नाहीत. त्यानंतर रोहितने गंभीरतने या प्रश्नाचे खरे उत्तर देत म्हणाला, आमच्यासाठी गेल्या सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर मला वाटते आत्मविश्वास महत्त्वाचा होता, जो आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजी दाखवला. मला वाटते तीच अशी एक गोष्ट आहे, जी आम्ही या सामन्यातून पुढे घेऊन जाऊ.

Exit mobile version