। मुंबई । वृत्तसंस्था । आरोग्य विभागाच्या विविध रिक्त पदांसाठी रविवारी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेत पुणे आणि नाशिक केंद्रांवर गोंधळ उडाला. या केंद्रांवर प्रश्नपत्रिका कमी आल्या, तर काही ठिकाणी उशिरा मिळाल्या अशी उमेदवारांची तक्रार होती. याचा फटका रायगड जिल्ह्यातील परीक्षार्थींनासुद्धा बसला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. परीक्षेच्या गोंधळाबाबत राजेश टोपे यांनी नाशिक, पुणे केद्रांवर प्रश्नपत्रिका ज्या बॉक्समधून देण्यात आल्या होत्या, त्या डिजिटल बॉक्सचे लॉक उघडण्यास उशीर झाला. हा दहा मिनिटांचा विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना तितका अतिरिक्त वेळ पेपर लिहिण्यास देण्यात आल्याचे सांगितले.
परीक्षा केंद्रावर पुन्हा गोंधळ
-
by Krushival

- Categories: sliderhome, नाशिक, पुणे
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
अलिबागच्या ‘मानाच्या दहीहंडी'च्या ट्रॉफीचे अनावरण
by
Sanika Mhatre
August 30, 2026
बाप्पाच्या माहेरघरात आगमनाची लगबग!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
शेकापमुळे भोंडकर कुटुंबाला न्याय!
by
Sanika Mhatre
August 30, 2026
नागाव ग्रामपंचायतीत कोट्यवधींचा कथित गैरव्यवहार
by
Sanika Mhatre
August 30, 2026
हरकत असताना पोशिर धरणासाठी झाडांची कत्तल?
by
Sanika Mhatre
August 30, 2026
रायगड हादरलं! पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
by
Sanika Mhatre
August 30, 2026