भारताला दावेदाव ठरविण्यामागे ‌‘षड्यंत्र’

आर.अश्विनचा दावा

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय क्रिकेट संघ कोणत्याही आयसीसी स्पर्धेत भाग घेतो, तेव्हा विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाते. अशीच परिस्थिती या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत होणार आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने भारताला प्रबळ दावेदार मानण्याबाबत एक मनोरंजक मुद्दा मांडला. तो म्हणाला की, हे विरोधी संघांचे षड्यंत्र आहे. स्वतःवरील दबाव कमी करून भारतावर दबाव आणण्यासाठी ते ही रणनीती अवलंबतात.असे त्याने सुचित केले.

अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, मला माहित आहे की, क्रिकेट जगतातील लोक म्हणतील की भारत प्रबळ दावेदार आहे. जगभरातील क्रिकेटपटू ही रणनीती म्हणून वापरतात आणि प्रत्येक आयसीसी स्पर्धेपूर्वी भारताचे प्रबळ दावेदार म्हणून नाव सांगतात. त्यांचा दबाव कमी करण्यासाठी आणि आपल्यावर अतिरिक्त दबाव टाकण्यासाठी ते ही रणनीती वापरतात. भारत प्रबळ दावेदारांपैकी एक असू शकतो.असा दावाही त्याने केला.

ऑस्ट्रेलिया पॉवरहाऊस
विश्वचषकासाठी इतर प्रबळ दावेदारांबद्दल बोलताना त्याने ऑस्ट्रेलिया देखील एक पॉवरहाऊस आहे. आम्ही बार्बाडोसमधील दुसऱ्या एक दिवसीय पराभवाबद्दल बोललो. मी म्हणालो की, आपण भारतीय संघाला पाठिंबा द्यायला हवा आणि कोणत्याही दबावाशिवाय विश्वचषकामध्ये पाठवायला हवं. बहुतेक लोक सहमत होते, पण भारतीय संघ जिंकली नाही तर काय होईल आणि सर्व काही चाहत्यांवर टाकले जाईल, याविषयी आधीच सावधगिरी बाळगली जात असल्याचे त्यांच्यापैकी काहींचे मत होते.

कोणीही चाहत्यांना दोष देऊ शकत नाही. चाहते हे संघाचे सर्वात महत्त्वाचे हितचिंतक आहेत. ते सामन्याचे संपूर्ण वातावरण बदलू शकतात. प्रत्येक वेळी घरचा संघ वेगात असतो आणि पाठिंबा प्रचंड असतो, तेव्हा इतर संघांसाठी हे काम कठीण असते. मला एवढेच सांगायचे आहे. मला माहित आहे की जेव्हा इतर संघ विमानतळावर किंवा हॉटेलवर येतात, तेव्हा यजमान म्हणून आम्ही नेहमीच स्वागत करतो. याबाबत आपण स्पष्ट असले पाहिजे.

रविचंद्रन अश्विन,क्रिकेटपटू
Exit mobile version