। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील आसलवाडी येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील आदिवासी विद्यार्थी यांच्यासाठी स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट यांच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थी यांच्यासाठी उभारले आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत श्री साई ट्रस्ट नवी मुंबई यांचे सहकार्याने कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील रायगड जिल्हा परिषद शाळा आसलवाडी शाळेसाठी स्वच्छतागृह बांधले आहे. या स्वच्छतागृह लोकार्पण सोहळा गणेश अय्यर आणि राधिका घुले यांचे हस्ते झाले. कर्जत तालुक्यातील आदिवासी तथा ग्रामीण भागात श्री साई ट्रस्ट आणि दिलीप घुले यांच्या माध्यमातून सुरु आहे. आसलवाडी सारख्या दुर्गम भागात सुसज्ज स्वच्छतागृह बांधून एक आदर्श कार्य केले आहे. या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती सदस्य तसेच आसलवाडी मधील ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते.