आठजणां विरोधात गुन्हा दाखल
| महाड | प्रतिनिधी |
शेतामध्ये बकर्या चारण्यासाठी सोडल्या या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या मारहाण आणि शिवीगाळ केल्या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील चोचींदे या गावामध्ये (दि.18) सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये परस्परविरोधी दोन तक्रारी दाखल झाल्या आहेत.
याबाबतची सविस्तर हकीगत अशी की, बारामती येथील जंदाबाई दगडे यांचा बकरी पालनाचा व्यवसाय असून त्या बकर्या घेऊन चोचिंदे या गावी आल्या होत्या. तेथे त्यांनी तंबू ठोकून शेजारच्याच शेतामध्ये बक-या चरविण्यासाठी सोडल्या. या गोष्टीचा राग आल्याने जंदाबाई दगडे व त्यांच्यासोबत असणार्या इतरांना भागोजी बरकटे, सागर बरकटे, दत्ता बरकटे (रा. चोचिंदे) व अमोल दगडे (रा. ढालकाठी )यांनी मारहाण केल्याची व झटापटीमध्ये गळ्यातील सोन्याचे गंथन हरवल्याची तक्रार जदाबाई यांनी दाखल केली आहे. दुसरी तक्रार भागोजी बरकटे यांनी दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनुसार जंदाबाई दगडे यांनी त्यांच्या घराशेजारी तंबू ठोकला होता व शेतामध्ये बकर्या चरविण्यासाठी सोडल्या. येथे बकर्या सोडू नयेत, गावातील बकर्या चरत आहेत, असे सांगून ही त्या ऐकल्या नाहीत व त्यांनी भागोजी बरकटे व यांच्यासोबत असणार्या इतरांना मारहाण केली. या प्रकरणी लक्ष्मण पडळकर, बाळू पडळकर, जंदाबाई दगडे व जयश्री ठोंबरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.