आत्मविश्‍वास ढासळल्यानं धर्माच्या आधारे टीकाः शरद पवार


। नाशिक । प्रतिनिधी ।

पंतप्रधान मोदींनी आत्मविश्‍वास गमावलाय त्यामुळे ते धर्म, जात याविषयावर बोलत आहेत, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी पार्टी काँग्रेसमध्ये विलीन होतील अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली होती. या टीकेला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. दिंडोरी लोकसभेचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या मनमाड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, हा देश लोकशाहीला मानणारा आहे. मोदींची भूमिका बोलायची एक अन् करायची एक आहे. मोदी सत्ता आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या. समाजातील लहान घटकांना आणखी लहान करण्याच्या प्रयत्न या सरकारने केला आहे.

शरद पवार यांनी कृषी खात्याचे मंत्री होते तेव्हा काय केले, असा सवाल करत आहेत. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात 700 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. कांद्यावर बंदी, साखरेवर बंदी सगळ्याच गोष्टीवर बंदी…नेमके काय चालले आहे. कष्टाने पिकवलेले बाजारपेठात गेले तर शेतकर्‍यांच्या पदरात चार पैसे पडतील. त्याचा संसार फुलेल. मोदी म्हणतात गरीबांना फुकट धान्य देता… कांदा निर्यातबंदीचा प्रश्‍न महत्वाचा होता पण केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली नाही. मोदींचे सरकार हे फसवे सरकार आहे. यांच्यावर विश्‍वास ठेवता येणार नाही.

कांद्याची निर्यात बंदी मी उठवली
2004 मध्ये कृषी मंत्री झालो तेव्हा अन्नधान्य आयात करावे लागले, अशी स्थिती होती. 2014 मध्ये देश अन्नधान्य स्वयंपूर्ण होता. मी कांद्याची निर्यात बंदी उठवली, शेतकरी कर्जमाफी केली आणि विचारात शरद पवारांनी काय केले, असे शरद पवार म्हणाले.
मोदींना प्रत्युत्तर
मोदी म्हणतात मी 80 टक्के लोकांना मोफत धान्य दिल, मात्र, हे अन्नधान्य पिकवतं कोण? याचे श्रेय शेतकर्‍यांचे आहे, याचे श्रेय जुन्या सरकारचे आहे आणि आम्हाला विचारात काय केले, असे म्हणत शरद पवारांनी नरेंद्र मोदींना उत्तर दिले आहे.
Exit mobile version