| रसायनी । वार्ताहर ।
रसायनी पाताळगंगा नावारूपास आलेले औद्योगिक क्षेत्र आहे. येथील मोहोपाडा शहरालगत दांड-रसायनी, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग असून या महामार्गावरून हजारो वाहनांची वाहतूक होत असते.प्रचंड वाहतूकीमुळे या महामार्गावर नेहमी अपघात होत असतात. अपघात झाल्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी मुंबईला न्यावे लागत आहे. या प्रवासात बराच वेळ वाया जात असल्याने काही वेळेला रुग्णाला रस्त्यातच आपला प्राण गमवावा लागत असल्याचे बर्याचदा होत आहे. यासाठी मोहोपाडा येथे सुसज्य अशा शासकीय रूग्णालयाची आवश्यकता आहे.
मोहोपाडा येथील तलावाशेजारी आरोग्य उपकेद्र सन 2009 मध्ये उभारण्यात आले आहे. मोहोपाडा उपकेंद्राच्या हद्दीत तळेगाव, पानशिल, शिवनगर,मोहोपाडा, नविन पोसरी, रिसवाडी, आंबिवली, रिस तसेच काही आदिवासी वाड्यासह आणखी काही गावांचा समावेश होत असून ताण वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, मोहोपाडा येथील उपकेंद्राला रुग्णांना वेळेवर उपचारासाठी योग्य व्यवस्था नसल्याने परीसरातील रूग्ण लोहोप, चौक, अजिवली येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी जात असल्याचे चित्र. पहावयास मिळत आहे.
रूग्णाला उपचारासाठी सोयीसुविधा नसल्याने येणार्या रूग्णांची संख्या फार कमी आहे. वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या फिरून आरोग्यविषयक जनजागृती गरीब व गरजू महिलांचे बाळंतपण करीत असून त्यांच्यावरील कामाचा ताणही वाढत आहे. सर्पदंश झाल्यास आरोग्य औषधोपचाराची सुविधा या उपकेंद्रात उपलब्ध नसल्याने रूग्णांना बाहेरून उपचार घ्यावे लागत आहेत. शासनाच्या निर्णयानुसार पाच हजार लोकसंख्येला एक आरोग्यसेवक व दोन डॉक्टर अशी सोय असतानाही वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांची लोकसंख्या जवळपास 65000 हजारांच्या आसपास असताना परीसरात सुसज्य प्राथमिक आरोग्य केंद्र असावे अशी मागणी नागरिकाडून करण्यात येत आहे.