व्यापारी, वकिलांसमवेत चर्चा
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत – खालापूर तालुक्यातील डॉक्टर, वकील व व्यापारी प्रतिनिधींशी सुसंवाद साधण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत तालुका पर्यटन तालुका केल्यास रोजंदारीसह अनेक प्रश्न मार्गी लागतील असे सूचित केले. पोसरी येथील परामाऊंट रिसॉर्टच्या सेमिनार हॉल मध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खा.राजन विचारे, आ.महेंद्र थोरवे, संपर्क प्रमुख बबन पाटील, सह संपर्क प्रमुख विजय पाटील, उप जिल्हाप्रमुख भाई गायकर व्यासपीठावर उपस्थित होते. विजय पाटील यांनी बैठकीचा उद्देश सांगितला.
खालापूरच्या वकिलांनी आम्हाला तहसील कार्यालय आणि भूमिअभिलेख कार्यालयातून सहकार्य मिळत नाही. असे सांगितले तर व्यापार्यांनी खोपोली लोकल आल्या नंतर शहरात गर्दी होते त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होतो. त्यासाठी लोकल येण्याच्या वेळवर दोन तीन पोलीस कर्मचारी असल्यास बर्याच अंशी प्रश्न सुटेल असे सांगितले.
सराफ असोसिएशनचे मोहन ओसवाल यांनी एखाद्या चोराने एखाद्या सोन्याचे दुकान दाखवल्यास त्याच्याकडून पोलीस खाते अव्वाच्या सव्वा सोने घेते. त्यामुळे व्यवसाय कसा करायचा? असा प्रश्न निर्माण होतो. याला आवर घालणे गरजेचे आहे. असे सांगून कर्जत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांचे रद्द करण्यात आलेले थांबे पुन्हा सुरू करावेत तसेच बंद केलेल्या गाड्या सुरू कराव्यात असे सूचित केले. मभविष्यात चौक पर्यंत येणारी मेट्रो खोपोली पर्यंत आणावी तसेच नवी मुंबईची ए सी बस सेवा खोपोली साठी सुरू करावी. मात्र त्यासाठी डेपो मध्ये सीएनजी ची सुविधा उपलब्ध करावी लागेल म्हणजे ती बस सेवा सुरू होईल अशी सूचनाही काहींनी केली.
आमदार थोरवे यांनी मकर्जत तालुका ग्रीन झोन आहे. सुमारे तीन हजार फार्म हाऊस तालुक्यात आहेत. हा तालुका मपर्यटन तालुकाफ म्हणून जाहीर झाल्यास रोजंदारीसह अनेक प्रश्न मार्गी लागतील. असे सूचित केले. त्यावर पत्रकार विजय मांडे यांनी पर्यटन तालुका जाहीर केल्यास ढाक मिनी माथेरान विकसित करा. ही मागणी गेली पंधरा वर्षे करीत आहे. ती मार्गी लागल्यास कर्जत तालुक्याचे अनेक प्रश्न सुटू शकतील व एक महत्वाचा तालुका म्हणून कर्जतकडे पाहिले जाईल अशी सूचना केली. नगरसेवक संकेत भासे यांनी मप्रत्येक तालुक्याला क्रीडा संकुलासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल असा अध्यादेश आहे मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. ती झाल्यास तालुक्यातील खेळाडूंना त्याचा चांगला उपयोग होईल. हे निदर्शनात आणून दिले.
डॉ. हेमंत पाटील यांनी, आरोग्य विषयक विमा योजनांचा निधी खाजगी कंपन्यांकडून पंधरा दिवसात मिळतो मात्र शासकीय योजनांचा निधी सहा – सहा महिने झाले तरी मिळत नाही. त्यामुळे आम्हाला सेवा देण्यात खूप अडचणी येतात. त्याचा मार्ग काढावा. तसेच असंघटित कामगारांचा प्रश्नही सोडवावा. अशी मागणी केली. खासदार विचारे यांनी सर्वांच्या समस्या जाणून घेऊन त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवून सकारात्मक मार्ग काढला जाईल.फ असा शब्द दिला. यावेळी सुनील पाटील,अॅड. सनी ढाकवळ, डॉ. मिलिंद सोनावळे आदी उपस्थित होते.