शक्तिपीठ महामार्गामुळे चव्हाणांच्या प्रभावक्षेत्रात असंतोष

। नांदेड । वृत्तसंस्था ।

भाजपाच्या प्रचारात नागपूर ते गोवा ह्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचा डंका वाजवला जात असताना हा महामार्ग भाजपाचे नवे खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रभावक्षेत्रातील शेतकर्‍यांवर जबर घाव घालणारा असल्याची संतप्त भावना शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ नरसी येथे झालेल्या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात समृद्धी महामार्गाला जोडणार्‍या नांदेड-जालना द्रुतगती महामार्गासोबत वरील शक्तिपीठ महामार्गाचेही गोडवे गायले; पण ज्या अर्धापूर तालुक्यात भाजपा आणि अशोक चव्हाण यांच्याबद्दल रोष निर्माण झाला आहे.याचा फटका भाजप उमेदवाराला बसू शकतो. परिसरात चव्हाण कुटुंबाची शेतजमीन असली, तरी शक्तिपीठ महामार्गामुळे पुढील काळात निर्माण होणार्‍या प्रश्‍नामध्ये चव्हाण यांनी आतापर्यंत आस्था दाखविलेली नाही, असे सांगण्यात आले.

Exit mobile version