आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटप

। उरण । वार्ताहर ।

होळीचा सण आणि याच अविट गोड सणात आपल्या बाळ-गोपाळांसोबत सण आनंदात साजरा व्हावा या विचारांच्यां विवंचनेत असणार्‍या वाडी-वस्तीवरील आदिवासी बांधवांनां महागाईच्या काळात आपल्या संसाराचा गाडा चालवताना जीव मेटाकुटीला येत असतो. या आदिवासी बांधवांची होळी आनंदात साजरी व्हावी याकरीता महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांनी रानसई येथील खोंड्याची वाडी, मार्गाची वाडी, भुर्याची वाडी, बंगल्याची वाडी, खैरकाठी, सागाची वाडी, केळ्याचा माळ, वेश्‍वी आदिवास वाडीतील सर्व आदिवासी बांधवांच्यां कुटुंबांना तब्बल अडीचशे किलो चणे-हरभरेे म्हणजे प्रत्येक वाडीवर पंचवीस ते तीस किलो या प्रमाणे वाटप केले. तसेच, आदिवासी बांधवांनां होळीच्या सणानिमित्त प्रेमाची भेट देऊन त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.

Exit mobile version