शेतकर्‍यांना कडधान्याचे वाटप

| चिरनेर | वार्ताहर |

उरण तालुक्यातील चिरनेर येथील शेतकर्‍यांना राज्य शासनाच्या उरण तालुका कृषी विभागामार्फत रब्बी हंगामातील पेरणीसाठी प्रत्येकी तीन किलो मूग आणि चार किलो हरभरा या कडधान्याचे वाटप करण्यात आले.

चिरनेर ग्रामपंचायत कार्यालयात (दि.11) हा कडधान्य वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी येथील कडधान्य पिकविणार्‍या शेतकर्‍यांना कडधान्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान, कडधान्य पेरून ते उगवल्यानंतर त्याची पाहणी कृषी विभागामार्फत करण्यात येणार आहे. याप्रसंगी उरणचे कृषी मंडळ अधिकारी श्री. लोहकरे, आंबा बागायतदार बळीराम म्हात्रे, चिरनेरचे पोलीस पाटील संजय पाटील, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील व पशुपालक शेतकरी राजेंद्र रेवसकर आदींच्या उपस्थितीत येथील शेतकर्‍यांना कडधान्याचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version