कोकण परिक्षेत्रचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहीते
सायबर साक्षर सुरक्षित झिराड गाव अभियानचे उद्घाटन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मोबाईल हि एक आफुची गोळी आहे. शरीराला एकादा का मोबाईलची सवय लागली तर तोडणे असह्य होऊन जाते, त्यामुळे पालकांनी मोबाईल पासून स्वता लांब राहून आपल्या मुलांना लांब ठेवण गरजेचे आहे. मोबाईलला आपल्या कुटूंबाचा हिस्सा होऊ देऊ नका, जेणेकरूण सायबरच्या पसरणार्या जाळ्याला थोपविण शक्य होणार असल्याचे कोकण परिक्षेत्रचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय मोहीते यांनी सांगितले.
मांडवा सागरी पोलीस ठाणे व झिराड ग्रामपंचायत यांचे संयुक्त विद्यमाने सायबर साक्षर सुरक्षित झिराड गाव अभियानचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रायगड पोलीस अधिक्षक अशोक दुधे, समाज कल्याण सभापती दिलीप भोईर, रायगड अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम, झिराड सरपंच दर्शना भोईर, मांडवा सागरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजीव पाटील, अलिबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस, सायबर गुन्हे शाखेचे प्रमुख पोलिस निरीक्षक राजन जगताप आदी उपस्थित होते.
सध्या डिजिटलायजिशनच्या युगात मोबाईल हि एक मुलभुत गरज झाली आहे. मात्र मोबाईलमुळे अनेक अपहार झाल्याचे आपल्याला पहायला मिळाले आहे. आज सोशल मिडीयावरील फ्रॉडच्या केसेस झाल्या आहेत. तरी नागरीक आजून स्वतामध्ये सुधारणा करताना दिसत नाहीत. त्यामुळे कुटूंबातील कुटूंब प्रमुखाने सर्वांना एकत्र बसून मोबाईल किती आणि कसा घातक आहे, त्याचे विपरीत परीणाम काय आहेत याची जाणिव करून देणे अत्यावश्यक असल्याचे संजय मोहीते यांनी सांगितले.
रायगड पर्यटन व औद्योगिक जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे. मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार होत असतात. इंटरनेटच्या माध्यमातून घर बसल्या सेवा घेणार्यांची संख्या दिवसें दिवस वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेकांनी ऑनलाईन सेवेला अधिक पसंती दर्शविली. तेव्हापासून ऑनलाईन खरेदी वाढू लागली आहे. यातूनच जिल्ह्यात सायबर गुन्हेगारी वाढू लागली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जाहीराती व भूल थापांना बळी पडून रायगड जिल्ह्यातील अनेकांची पैसे अथवा वस्तूच्या स्वरूपात फसवणूक असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यामध्ये 2016 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत 120 गुन्हे दाखल झाले आहेत. याची नोंद सायबर सेल विभागाकडे आहे. आतपर्यंत फक्त नऊ गुन्ह्यांची उकल करण्यास सायबर सेल यशस्वी ठरले आहे . या गुन्हयातील आरोपी अन्य राज्य व देशातील असल्याने प्रलंबित गुन्ह्यांची उकल करताना विलंब होत आहे. परंतु नागरिक जाहीरात व भूल थापांना बळी पडू नये यासाठी रायगड पोलीस दलाकडून जनजागृती सुरु केली आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हददीतील झिराड या गावाची या अभियानासाठी निवड केली आहे. सायबर साक्षर सुरक्षीत गाव हा पायलेट प्रोजेक्ट झिराड येथे राबविण्यास सुरुवात केली आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रोजेक्टचे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु होते. प्रस्ताविक विवेक तेंडूलकर, राजीव पाटील, सारीका राऊत यांनी तर सुत्रसंचलन संदीप जगे आणि पूजा पाटील सुतार यांनी केले.
पाचवर्षात साडेनऊ कोटींची फसवणूक
जिल्ह्यामध्ये 2016 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत 120 गुन्हे दाखल झाले असून 9 कोटी 50 लाखांची फसवणूक झालीआहे. याची नोंद सायबर सेल विभागाकडे आहे. आतपर्यंत फक्त नऊ गुन्ह्यांची उकल करण्यास सायबर सेल यशस्वी ठरले आहे . या गुन्हयातील आरोपी अन्य राज्य व देशातील असल्याने प्रलंबित गुन्ह्यांची उकल करताना विलंब होत आहे. परंतु नागरिक जाहीरात व भूल थापांना बळी पडू नये यासाठी रायगड पोलीस दलाकडून जनजागृती सुरु केली आहे.
अशोक दुधे, पोलिस अधिक्षक