| मुंबई | प्रतिनिधी |
ट्रान्सहार्बर लिंक सागरी महामार्गामुळे मुंबई ते अलिबाग वीस मिनिटात पार करणे शक्य होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतीक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले आहे . या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नसणार आहे. ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरणार असून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम 90 टक्के काम पूर्ण झाले आहे . यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग आहे . मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज 2 मधील पहिला सर्वात जास्त लांबीचा म्हणजेच सुमारे 180 मीटर लांबीचा आणि सुमारे 2300 मेट्रिक टन वजनाचा ऑर्थोोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री दादाजी भुसे, संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्रीनिवासन, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आदी उपस्थित होते.