। दिघी । प्रतिनिधी ।
आजच्या स्पर्धात्मक युगात टिकायचे असेल तर उच्च शिक्षित असणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करा. स्पर्धात्मक परीक्षा देऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगा असे आवाहन दिघी सागरी पोलिस ठाण्याचे सहा पोलिस निरीक्षक संदीप पोमन यांनी केले. वडवली गावातील आगरी समाजाकडून पोलिस पाटील दिलीप नाक्ती, दीपक कांबळे आणि सहा पोलिस निरीक्षक पोमन यांचे कृतज्ञता सत्कार आयोजित केले होते.
यावेळी वडवली आगरी समाज अध्यक्ष संतोष नाक्ती, किशोर बिराड यांच्यासह सर्व पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चाळके यांनी अतिशय सुंदररीत्या केले.