शासनाकडुन नुकसान भरपाई भेटण्यासाठी प्रयत्न

सुधाकर घारे यांचे आश्‍वासन

। कर्जत । वार्ताहर ।

गेल्या आठवडाभरात अवकाळी पावसाने बरेच नुकसान केले. यामध्ये प्रामुख्याने विजेचे खांब कोसळल्याने अनेक गावांमधील वीजप्रवाह खंडीत झाला आहे. पोशीर ग्रामपंचायत भागातील तसेचे शेलु ग्रामपंचायत भागातील अनेक ग्रामस्थांनी सुधाकर घारे यांना फोन करुन आपल्या अडचणी सांगीतल्या. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता सुधाकर घारे यांनी घटनास्थळी भेटी देऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी सुधाकर घारे यांनी ठरावीक कुटुंबाना तात्काळ वयक्तिक मदत केली. तसेच, झालेल्या नुकानीची शासनाकडून भरपाई मिळावी यासाठी त्वरीत पंचनामे करण्याची विनंती शासकिय अधिकार्‍यांना केली. विजप्रवाह खंडीत झाल्याने अनेक कामे ठप्प पडली आहेत. त्यामुळे त्याच्यावर लवकरात लवकर काम करण्याच्या सुचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना फोन करुन दिल्या.

Exit mobile version