| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात राज्य सरकारने घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत आहे. तसेच पावसामुळे आतापर्यंत 89 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील अतिवृष्टी असल्याने 249 गावे बाधित झाले आहेत. पावसामुळे होणारे नुकसान चालू राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.