। उरण । वार्ताहर ।
चिरनेर परिसरात बुधवारी (दि. 7) संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे क्षणात नाल्यांना, ओढ्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यातच ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मुसळधार पावसामुळे गावातील धनाजी नारंगीकर यांच्या घराजवळील पडवी पडल्याची घटना घडली. त्यामुळे रहिवाशांची भंबेरी उडाली. गावातील अनेकांच्या घरात पूराचे पाणी शिरल्याचे पूर संकट ओढावले. त्यामुळे घरांचे नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.