राज्य सरकारला धक्का | | | | मुंबई | प्रतिनिधी | इयत्ता अकरावीची सीईटी उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें उच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. तर, प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. याचबरोबर, सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार होती. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार होती व १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार होती.
अकरावीची सीईटी उच्च न्यायालयाकडून रद्द
-
by Krushival

- Categories: sliderhome, देश, मुंबई
- Tags: cetcet cancelhigh courtjunior collegemarathi newsmarathi news raigadmarathi newspaper
Related Content
Inspection of school uniforms: शालेय गणवेशाची होणार तपासणी
by
Antara Parange
June 17, 2026
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण: शनिवारी लागणार निकाल
by
Antara Parange
June 17, 2026
Nagaon Water Issue: पाण्यासाठी नागावच्या सरपंच आक्रमक
by
Antara Parange
June 17, 2026
महाड, पोलादपूरमधील शिक्षण प्रश्न तापला
by
Antara Parange
June 17, 2026
चित्रलेखा पाटील यांनी केले नयन पाटील यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
by
Antara Parange
June 17, 2026
कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार
by
Antara Parange
June 17, 2026