राज्य सरकारला धक्का | | | | मुंबई | प्रतिनिधी | इयत्ता अकरावीची सीईटी उच्च न्ययालयाकडून रद्द करण्यात आली आहे. इयत्ता दहवीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें उच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. तर, प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. आता सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. याचबरोबर, सहा आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. राज्य मंडळाने दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या निर्णयानुसार अकरावी प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेतली जाणार होती. ओएमआर उत्तरपत्रिकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार होती व १९ जुलैपासून सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करता येणार होती.
अकरावीची सीईटी उच्च न्यायालयाकडून रद्द
-
by Krushival

- Categories: sliderhome, देश, मुंबई
- Tags: cetcet cancelhigh courtjunior collegemarathi newsmarathi news raigadmarathi newspaper
Related Content
वेश्याव्यवसायात अडकलेल्या दोन अल्पवयीन मुलींची सुटका
by
Sanika Mhatre
February 23, 2026
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा टँकरला अपघात
by
Sanika Mhatre
February 23, 2026
खळबळजनक! रोह्यात दुचाकीस्वाराकडून चाकू हल्ला; तिघेजण जखमी
by
Sanika Mhatre
February 23, 2026
खालापूरमध्ये टायर ट्यूबमधून अवैध दारूची तस्करी
by
Antara Parange
February 23, 2026
अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा
by
Sanika Mhatre
February 22, 2026
गर्भवतींची तपासणी करण्याचे आदेश
by
Sanika Mhatre
February 22, 2026