गवत विक्रीतून आदिवासींना रोजगार

| पाताळगंगा | वार्ताहर |

शेतीची कामे पूर्ण झाल्यामुळे आदिवासी बांधवांच्या हाताला कोठेच काम मिळेनासे झाले आहे. दरम्यान, पावसाळ्यात उगवलेले गवत आदिवासी बांधवांना रोजगार मिळून देत आहे. ग्रामीण भागात शेतजमिनीशिवाय बराचसा भाग ओसाड असतो. याच ओसाड जमिनीवर उगवणारे गवत कापून ते विक्री करीत असल्याचे चित्र सध्या तालुक्याच्या ठिकाणी पहावयास मिळत आहे.आदिवासींना आपला उदरनिर्वाह कसा करायचा, ही चिंता सातत्याने भेडसावत असते. मात्र, दरवर्षी पावसाळ्यामुळे तयार होणाऱ्या गवतामुळे त्यांचा रोजगाराचा प्रश्न सुटत असतो.सध्या गवताला मोठी मागणी असल्यामुळे रस्त्याच्या बाजूला निर्माण झालेले गवत आदिवासी कापून त्याची विक्री करीत आहेत. शहरातील मोठे तबेलेवाले व इतर व्यक्ती मोठ्या प्रमाणात गवताची खरेदी करत असून, यातून त्यांचा उदरनिर्वाह होत आहे.

Exit mobile version