महानिकाल! सर्वांना न्याय मिळेल- राहूल नार्वेकर

| मुंबई | प्रतिनिधी |

आज महाराष्ट्राच्या राजाकारणातील ऐतिहासिक दिवस असून संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींकडे लागलं आहे. आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय जाहीर करणार आहेत. अशातच निकालापूर्वी माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिक्रिया दिली. निकालात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले. संविधानात ज्या लिखित तरतूदी आहेत, त्या सर्व तरतूदींना अनुसरुनच हा निर्णय असेल, असंही ते म्हणाले आहेत. तसेच, हा निर्णय देताना कायद्याचं पालन होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बोलताना म्हणाले की, आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज दिला जाईल. हा निकाल निश्चितपणे कायद्याला धरून असेल, संविधानाच्या तरतूदी आहेत आणि सर्वोच्च न्यायालयानं ज्या काही सूचना केलेल्या आहेत, त्या लक्षात ठेवून निर्णय दिला जाईल, या निर्णयातून सगळ्यांना न्याय मिळेल. तसेच, या निर्णयातून दहाव्या सूचीतल्या काही बाबी आतापर्यंत स्पष्ट झालेल्या नव्हत्या, त्यातून हा निश्चितपणे अत्यंत मुलभूत आणि बेंचमार्क असा निर्णय असेल आणि या निर्णयातून कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत, असं राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

काही विशेष घटना घडल्या आहेत, ज्याचा उलगडा आजपर्यंत कोणत्याही परिस्थितीत झालेला नाही. मात्र, या प्रकरणात अर्थ लावण्याची गरज होती. कायद्यातील सर्व तरतुदींचा विचार करूनच योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. निश्चितच या देशासाठी एक रक्षण करणारा निर्णय 10 सूचीनुसार घेतला जाईल, असं राहुल नार्वेकर म्हणाले.

Exit mobile version