। खांब-रोहे । वार्ताहर ।
पावसाळी हंगामात परतीच्या पावसाने तयार भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने अगोदरच शेतकरी वर्ग संकटात सापडला असतानाच मजुरीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने शेतकरी वर्ग बेजार झाला आहे.
अगोदरच शेती व्यवसाय करणे परवडत नाही. त्यातच आता मजुरीचेही दर गगनाला भिडले असल्याने शेती करावी की, नाही याच विचारात शेतकरी वर्ग पडला आहे. यावर्षीच्या पावसाळी हंगामात शेतीपूरक पाऊस पडल्यामुळे पिके जोमदार पिकली होती. परंतू ऐन कापणी, बांधणीच्या हंगामात परतीच्या पावसाने मुक्काम वाढविल्याने शेतीक्षेत्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यातच मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे.