विरारच्या मनवेल पाडामध्ये भीषण अग्नितांडव!

। वसई /विरार । वार्ताहर ।
विरार पूर्व येथील मनवेल पाडा परिसरात संत नगर येथील सात ते आठ दुकानांना अचानक आग लागली. ही घटना शुक्रवारी मध्य रात्री 12 च्या सुमारास घडली. दुकानांमध्ये लागडी फर्निचर आणि कापसाच्या गाद्या असल्याने काही क्षणात आगीने लोन सर्वत्र पसरले आणि सर्व दुकानें जळून खाक झाली.
सदराची दुकाने ही रस्त्याच्या कडेला रहिवाशी इमारती पासून काही अंतरावर असल्याने मोठी दुर्घटना टळली. वसई विरार महानगर पालिका अग्निशन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवार नियंत्रण मिळवले आहे. एकूण 30 जवान आणि 4 पाण्याचे बंब घटनास्थळी आग विझविण्यासाठी दाखल झाले होते.


मिळालेल्या माहितीनुसार सदराची दुकाने बेकायदेशीर असून या ठिकाणी अग्नीसुरक्षा रोधक कोणत्याही यंत्रणा नव्हत्या. यामुळे आग विझविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रथमदर्शी सदराची आग ही शॉक सर्किटने लागली असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे. सरदारच्या दुकानात कुणी मंजूर अथवा कारागीर राहत नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण लाखो रुपयाची वित्तहानी झाल्याचे समाजात आहे.

Exit mobile version