। पनवेल । वार्ताहर ।
राज्यात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदील दाखविल्याने पनवेलमध्ये 8 वी ते 12 वी च्या शाळांचे वर्ग सोमवारपासून सुरू करण्यात आले. खांदा वसाहत येथील कै. आगरी शिक्षण संस्थेचे गोविंदरावजी काशिनाथजी गावंड माध्यमिक विद्यालयात सोमवारी इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग सुरू झाले. प्रा.पंकज भगत व सर्व शिक्षकवृंद विद्यार्थ्यांनच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारा जवळ उभे होते. प्राचार्य स्वतः विद्यार्थ्यांचे तापमान मोजत असताना दिसले. यावेळी प्राचार्यांनी सांगितले की, विद्यार्थी नसल्याने शाळा म्हणजे निर्जीव इमारत वाटत होती, मात्र आज तुम्ही सर्व आल्यामुळे इमारत सजीव वाटायला लागली. तसेच शाळेत विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायला हवी तसेच मोबाईलचा वापर शक्यतो कमी करण्याबाबत सरांनी मार्गदर्शन केले. यावेळी जवळपास 125 विद्यार्थी शाळेत उपस्थित होते.
…अखरे शाळेच्या भिंती बोलू लागल्या
![](https://krushival.in/grygrars/2021/10/SHALA-1-1024x477.jpg)