| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील शहापूर येथे पहाटेच्या तीन वाजता उधाणाचे पाणी घरात शिरल्याची घटना घडली आहे. 22 घरांसह 300 एकर शेतीला या उधाणाचा तडाखा बसला आहे. खारबदीस्तीच्या दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष उदानसिनता शेतकर्यांच्या मुळावर उठत असल्याचा आरोप श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.
सोमवारी पहाटे गाढ झोपेत असलेल्या गावकर्यांची या उधाणामुळे चांगलीच तारांबल उडाली. त्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. खारभूमी विभागाच्या उदासिनतेमुळे गावकर्यांना सातत्याने या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट 2021 मध्ये शहापूर गावालगत असलेल्या खारबंदीस्थीला तडे गेले होते. तेव्हापासून खाडीतील उधाणाचे पाणी लगतच्या परीसरात शिरण्यास सुरवात झाली होती. गावकर्यांनी वेळोवेळी ही बंदीस्थी दुरुस्त करण्याची मागणी केली होती. पण प्रशासनाने तांत्रिक कारणे पुढे करत गवकर्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.
खारबंदीस्तीच्या दुरुस्तीसाठी पोहोच रस्ता तयार करणे आवश्यक आहे. या रस्त्यासाठी आवश्यक सामुग्री जेएसडब्लू कंपनीने देण्याची तयारी दाखवली होती. ग्रामस्थांनी रोजगार हमीतून खारबंदीस्तीची दुरुस्ती करण्याची तयारी दाखवली होती. मात्र प्रशासकीय यंत्रणांमध्ये समन्वय नसल्याने वर्षभरानंतरही हे काम सुरु होऊ शकलेले नाही. दरम्यान उधाणामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा कृषी व खारभूमी यांनी सयुक्त पणे गरजेचे आहे अशी मागणी आत्माराम गोमा पाटील यांनी केली आहे. तर चिखलातून शासकीय कर्मचार्यांना जाणे शक्य होत नाही हि बाब लक्षात घेऊन खारभूमी विभागाने ड्रोन कॅमेराचा वापर केला पाहिजे अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे संघटक राजन भगत यांनी केली आहे.