ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण
| म्हसळा | वार्ताहर |
देशभर साजरा होत असताना आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घर घर तिरंगा फडकविण्यात आला असताना तालुक्यातील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या इमारतीवर मात्र 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी सोडाच, पण 26 जानेवारी या प्रजासत्ताकदिनीसुद्धा ध्वजारोहण न केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव संतापाचे वातावरण आहे. सबंधित अधिकार्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
उपअधीक्षक भूमिअभिलेख म्हसळा या कार्यालयावर भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवार, दि.26 जानेवारी रोजी ध्वजारोहण केलेच नाही. शिवाय शासनाच्या ‘घर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्टपर्यंत तीन दिवस देशातील प्रत्येक घर, शासकीय व निमशासकीय तसेच खाजगी आस्थापना यांना ध्वजारोहण करण्याचे अवगत केले होते. मात्र असे असताना उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाने एकही दिवस ध्वजारोहण करता शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राष्ट्राप्रती आपली किती निष्ठा आहे, हे प्रदर्शीत केले आहे. स्वतःच्या जागेत सुमारे 50 लाख शासकीय निधी खर्च करून बांधलेल्या शासकीय इमारतीवर झेंडा न फडकविणे हा राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ठरणे आवश्यक आहे, अशी आग्रही मागणी जनतेची आहे. उपअधिक्षक भूमि अभिलेख या अधिकार्यांजवळ भ्रमणध्वनीव्दारे संर्पक साधला या कार्यालयाची स्वतंत्र इमारत झाल्यापासून 26 जाने. (प्रजासत्ताक दिन), 1 मे (महाराष्ट्र दिन) आणि 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) या तीनही राष्ट्रीय सणाला आमच्या कार्यालयाची ध्वजारोहणाची परंपरा नाही, असे स्पष्ट सांगितले.
राज्यात प्रजासत्ताक दिन निर्धोकपणे राष्ट्रीयसण म्हणून साजरा करीत असताना म्हसळा तालुक्यातील वर्ग 1चा शासकीय अधिकारी ध्वजारोहण करीत नाही, हे कृत्य आहे, असून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. – महादेव पाटील, माजी सभापती तथा अध्यक्ष, म्हसळा तालुका हिंदू ग्रामस्थ समाज