सतर्कतेचा इशारा! उद्यापासून चार दिवस मुसळधार पाऊस

। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात गेल्या काही दिवासांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता राज्यात उद्यापासून चार दिवस पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात 30 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होण्यार्‍या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्‍चिम व मध्य भारतातून प्रवासाची शक्यतेमुळे महाराष्ट्र राज्यात येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Exit mobile version